क्रिकेट

IND vs AUS T20 : सूर्यकुमारच्या विश्‍वासामुळे यश; अखेरच्या षटकातील यशानंतर अर्शदीपची कबुली

संघ व्यवस्थापन व कर्णधार सूर्यकुमार यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला.

बंगळुरू : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात विजयासाठी 10 धावांचे आव्हान होते. यावेळी हे षटक टाकण्यासाठी चेंडू अर्शदीप सिंगकडे देण्यात आला. पहिल्या तीन षटकात ३७ धावा लुटणाऱ्या अर्शदीपने या षटकात केवळ तीन धावा दिल्या आणि भारताला सहा धावांनी विजय मिळवून दिला.

या पार्श्‍वभूमीवर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संघ व्यवस्थापनाने दाखविलेल्या विश्‍वासामुळेच यश संपादन करू शकलो, अशी भावना अर्शदीपने व्यक्त केली.

अर्शदीप पुढे म्हणाला, “माझ्या गोलंदाजीमुळे अनेक धावा झाल्या, पण देवाच्या कृपेने मला चमकण्याची अधिक संधी मिळाली.” संघ व्यवस्थापन आणि कर्णधार सूर्यकुमार यांनी माझ्यावर विश्वास दाखवला.

जे होईल ते होईल, असे सूर्यकुमारने सांगितले. तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी दिला. गेल्या काही वर्षांत खूप काही शिकायला मिळाले. चुका सुधारण्याचा प्रयत्न केला.

फक्त वॉशिंग्टन सुंदर असते तर…
बंगळुरू येथे झालेल्या पाचव्या सामन्यात भारताच्या विजयात अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई हे फिरकी गोलंदाज चमकले. या सामन्यासाठी भारतीय संघात अतिरिक्त फिरकी गोलंदाज असता तर भारतीय संघ अधिक सहज जिंकला असता, असे मत कर्णधार सूर्यकुमार यादव याला वाटते.

अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई या दोन फिरकी गोलंदाजांसह वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश केला असता तर भारतीय संघ मोठा विजय मिळवू शकला असता, असे तो यावेळी म्हणाला.

माझ्या गोलंदाजीवर जास्त धावा झाल्या. शेवटच्या षटकात चेंडू माझ्याकडे सोपवल्यानंतर भारतीय संघ हरणार नाही असा निर्धार केला होता. सूर्यकुमार यादव यांचा विश्वास माझ्या पाठीशी होता. मनात शंका निर्माण करण्यासाठी मॅथ्यू वेडला सुरुवातीला बाऊन्सरने बोल्ड केले. त्यानंतर तो बाद झाल्यानंतर विजय निश्चित झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *