मोदींची गॅरंटी म्हणजे निवडणूक विजयाचा फॉर्म्युला नव्हे तर गरिबांना दिलेली वचनपूर्ती आहे, असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं यावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपांना सविस्तर उत्तरं दिली.
गरिबांचा विश्वास ताकद वाढवतो
मोदी म्हणाले, गरिबांचा आपल्यावर असलेला विश्वास आपला लढण्याची ताकद देतो. मोदींची गॅरंटी हा निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला नाही तर गरिबांच्या विश्वासाची पूर्तता आहे. सध्या देशातल्या प्रत्येक गरिबाला माहितीए की मोदी कधीही आपल्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही. त्यामुळं त्यांच्या विश्वासाला माझ्याकडून कधीही तडा जाणार नाही.
‘मोदी की गॅरंटी’ कॅम्पेन
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी ‘मोदी की गॅरंटी’ हे कॅम्पेन चालवलं होतं. याचं जोरावर भाजपनं राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पराभूत केलं होतं. तर मध्य प्रदेशात मोठा विजय मिळवला होता. तर तेलंगाणात आपली कामगिरी सुधारली होती.
विरोधकांच्या आरोपांना दिलं उत्तर
विरोधकांकडून सध्या देशातील बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला घेरलं आहे. विरोधकांच्या या आरोपांनाही मोदींनी मुलाखतीत उत्तरं दिली आहेत. त्यांनी म्हटलं की, पायाभूत सुविधांमध्ये सरकारनं केलेल्या गुंतवणुकीमुळं मोठ्या प्रमाणावर विकास आणि रोजगार निर्माण होणार आहेत. त्यामुळं आम्ही सातत्यानं भांडवली गुंतवणुकीचा परिप्रेक्ष वाढवला आहे.
विरोधकांच्या आरोपांना दिलं उत्तर
विरोधकांकडून सध्या देशातील बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला घेरलं आहे. विरोधकांच्या या आरोपांनाही मोदींनी मुलाखतीत उत्तरं दिली आहेत. त्यांनी म्हटलं की, पायाभूत सुविधांमध्ये सरकारनं केलेल्या गुंतवणुकीमुळं मोठ्या प्रमाणावर विकास आणि रोजगार निर्माण होणार आहेत. त्यामुळं आम्ही सातत्यानं भांडवली गुंतवणुकीचा परिप्रेक्ष वाढवला आहे.
धोरणांमधील सुधारणांचा चांगला परिणाम
तसेच धोरणांच्या सुधारणांद्वारे लोकांचं जीवनमान सुधारण्याच्या दृष्टीनं लक्ष केंद्रीत करण्यात आला आहे. या सुधारणांमुळं भारताच्या विकासाच्या प्रवासानं आता वेग धारण केला आहे. यामुळं भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाकडं जाण्याचा आत्मविश्वास वाढला आहे.