यशोगाथा

Cashew Management : नियोजनबद्ध काजू व्यवस्थापनात सातत्य

Success Story of Farmer : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एडगाव (ता. वैभववाडी) येथे विनोद श्रीपत रावराणे यांची चौदा एकर जमीन आहे. त्यातील चार एकरांमध्ये सघन पद्धतीने त्यांनी काजूच्या वेंगुर्ला ४ आणि वेंगुर्ला ७ या जातींची लागवड केली आहे.

काजू शेती : विनोद श्रीपत रावराणे यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एडगाव (आता वैभववाडी) येथे चौदा एकर जमीन आहे. वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7 काजू जातींची चार एकरात त्यांनी सखोल लागवड केली आहे. यात सुमारे 380 काजू कलम आहेत. काजूची लागवड केलेली जमीन डोंगराळ आहे. बागेतील सर्व कामांचे नियोजन त्यानुसार केले जाते.

मागील कामकाज

मागील हंगाम हा एप्रिल महिन्यात सुरू झाला. हंगाम पूर्ण संपल्यानंतर बागेतील काजू झाडाखाली पडलेल्या पालापाचोळ्यात काही काजू बी पडलेले होते. ते एकत्रित गोळा केले. त्यानंतर सर्व पालापाचोळा एकत्रित करून कलमांच्या बुंध्यात रचून ठेवला.

दरवर्षी साधारण जूनच्या दुसऱ्या आठवड्यात बागेतील कामांना सुरुवात होते. मात्र या वर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे नियोजनाला उशीर झाला. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात कलमांना खतमात्रा दिली जाते. परंतु या वर्षी उशिरा पाऊस झाल्यामुळे जूनच्या अखेरीस कलमांना खतमात्रा दिली. प्रतिझाड साधारण दोन ते तीन किलो प्रमाणे मिश्रखते आणि आठ ते दहा किलो चांगले कुजलेले शेणखत दिले.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाची तीव्रता जास्त होती. त्यामुळे या काळात बागेत कोणतीही कामे करता आली नाहीत.

मागील नोव्हेंबर महिन्यात पाऊस थांबल्यानंतर बागेत वाढलेले तण काढण्याचे नियोजन होते. मात्र काही कारणास्तव त्यास विलंब झाला.

आगामी नियोजन :

सध्या ग्रासकटरच्या साह्याने बागेतील तण काढण्याचे काम सुरू आहे. याशिवाय बागेत काही झाडेझुडपेदेखील वाढली होती. ती देखील तोडण्याचे काम सुरू आहे.

मागील काही दिवसांपासून ढगाळ हवामानासह पावसाचे वातावरण तयार होत आहे. सध्या कलमांना पालवी आणि अल्प प्रमाणात मोहोर येत आहे. पुढील आठवड्यात मोहराचे प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे.

सध्याचे ढगाळ वातावरण पाहता बागेत ढेकण्या (टी मॉस्किटो बग) या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुढील आठवड्यात रासायनिक फवारणी केली जाईल.

बागेत आणि बांधावर वाढलेल्या विविध तणवर्गीय वनस्पतींमुळे देखील कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. कारण या वनस्पती कीड-रोगांसाठी यजमान म्हणून कार्य करतात. त्यासाठी या वनस्पती संपूर्णपणे काढून नंतर रासायनिक फवारणी करण्याचे नियोजन आहे. जेणेकरून फवारणीचे प्रभावी परिणाम मिळतील.

कापलेले गवत कलमांच्या बुंध्यात रचून ठेवले जाईल. त्याचा कलमांना फायदा होतो. तसेच बागेतील सर्व पालापाचोळा गोळा करून एकत्रितपणे तो कलमांच्या बुंध्यात रचला जाईल. त्यामुळे तापमान वाढल्यास कलमांवर परिणाम होत नाही.

डिसेंबर महिन्याच्या अखेरीला बागेचे निरीक्षण करून रासायनिक फवारणीचे नियोजन केले जाईल.

बागेभोवती वाढलेल्या गवतामुळे उन्हाळ्यात वणवा लागण्याची शक्यता असते. त्यासाठी गवत काढल्यानंतर बागेभोवती आगरेषा आखली जाईल. सध्या गवत ओलसर असल्यामुळे आगरेषा आखणी करणे शक्य होत नाही. परंतु पुढील आठ ते दहा दिवसांत गवत पूर्ण सुकल्यानंतर आगरेषेची आखणी केली जाईल.

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात वातावरण पाहून तिसऱ्या रासायनिक फवारणीचे नियोजन केले जाईल.

या वर्षी काजू हंगाम दरवर्षीच्या तुलनेत पंधरा ते वीस दिवस विलंबाने सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात काजू बी परिपक्व होईल अशी शक्यता आहे. दरवर्षी अंदाजानुसार वेंगुर्ला चार जातींची कलमे सुरुवातीला परिपक्व होण्यास सुरुवात होते. त्यानंतर साधारण वीस दिवसांनी वेंगुर्ला सात या जातीच्या कलमांचे बी परिपक्व होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *