भारताने एडबॅस्टन मैदानावर इतिहास रचला! दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर ३३६ धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.कर्णधार शुभमन गिलने जबरदस्त खेळी करताना सामन्यात २६९ आणि १६१ धावा ठोकल्या. गिलच्या बॅटमधून आलेल्या या खेळीमुळे इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच दाणादाण उडाली.दुसरीकडे, गोलंदाज आकाश दीपने सामन्यात एकूण १० बळी (पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ६ बळी) घेत इंग्लंडच्या फलंदाजांना संधीच दिली नाही.भारताचा हा एडबॅस्टनवरील पहिलाच विजय ठरला आहे आणि मालिकेत आता १-१ अशी बरोबरी झाली आहे. पुढील सामना लॉर्ड्सवर १० जुलैपासून रंगणार आहे.
Read MoreAuthor: Akhilesh
“6 विकेट्स फटाफट! इंग्लिश फलंदाजांची उडाली भंबेरी”
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने इंग्लंडच्या फलंदाजांवर अक्षरशः वादळ उठवलं! दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात सिराजने केवळ 70 धावांत 6 बळी घेतले आणि इंग्लंडची डावाची घसरण सुरू केली. त्याने जो रूट, बेन स्टोक्स यांसारख्या प्रमुख फलंदाजांना झटपट तंबूत पाठवून इंग्लंडचा डाव कोलमडला. विशेष म्हणजे, बेन स्टोक्सला त्याने पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकवर बाद केलं, ज्यामुळे स्टेडियममध्ये एकच सन्नाटा पसरला.इंग्लंडची अवस्था एकवेळ 5 बाद 84 अशी झाली होती. मात्र जेमी स्मिथ (184*) आणि हॅरी ब्रूक (158) यांनी जबरदस्त झुंज देत 303 धावांची भागीदारी केली आणि इंग्लंडला 407 धावांपर्यंत नेलं. तरीसुद्धा भारताला पहिल्या…
Read More